📕भारत-चीनदरम्यान डोकलामवरुन उद्भवलेला तिढा यशस्वीपणे सोडविणारे विजय केशव गोखले यांची भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
📕पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या कॅबिनेट नियुक्ती समितीने विजय गोखले यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्याचे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
📕गेल्या तीन वर्षांपासून परराष्ट्र सचिवपद सांभाळत असलेले एस. जयशंकर यांच्या जागी विजय गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
📕
परराष्ट्र सचिवपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. पण जयशंकर यांना गेल्या वर्षी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. जयशंकर २८ जानेवारी रोजी पदमुक्त होतील.
📕भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेले विजय गोखले हे दुसरेच मराठी अधिकारी आहेत.
📕यापूर्वी रामचंद्र दत्तात्रय साठे यांनी ९ नोव्हेंबर १९७९ ते ३० एप्रिल १९८२ दरम्यान चरण सिंह आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना परराष्ट्र सचिवपद भूषविले आहे.(@spardhavishwa)
📕दिल्ली विद्यापीठातून इतिहासात एम. ए. केल्यानंतर विजय गोखले १९८१ साली भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाले.
📕विजय गोखले मलेशियात जानेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१३ दरम्यान भारताचे उच्चायुक्त होते. ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१६ दरम्यान ते जर्मनीत भारताचे राजदूत होते.
📕जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.